बांगलादेशात लष्कराची रस्त्यावर गस्त   

बांगलादेशाच्या रस्त्यांवर लष्कराने गस्त वाढवली आहे. येथे गेल्या काही दिवसांत लष्कराने आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. अहवालानुसार, लष्कर अनेक ठिकाणी पहारा वाढवला असून, सैन्याचे जवान चिलखती वाहनांसह सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
 
गेल्या महिन्यात कायदा आणि सुव्यवस्था एजन्सींसह लष्कराने दोन हजारांहून अधिक नागरिकांना अटक केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून सैन्याने आतापर्यंत दहा हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या एका महिन्यात दोन हजार १८८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लष्कर मुख्यालयाचे कर्नल शफीकुल इस्लाम यांनी सांगितले, की गेल्या दोन महिन्यांत एप्रिलच्या मध्यापर्यंत दोन हजार ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत, लष्कराने  दोन हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले. आयएसपीआर किंवा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका निवेदनात म्हटले आहे, की १५ ते २२ मे पर्यंत चाललेल्या आठवडाभराच्या कारवाईत लष्कराने २५८ जणांना अटक केली. देशभरात लष्कर आणि पोलीस मिळून ही मोहीम राबवत आहेत.

Related Articles